Saturday, March 19, 2011

मैत्री म्हणजे .............. !!!




जेव्हा जीवाला शिवाला.
रंकाच रावाला,
भक्ताच देवाला,
न सांगताही कळल जाता
तेव्हाच मैत्रीच नातं
आपोआप जुळल जात.!

मैत्री मैत्री असते,
बाजारात विकत
मिळत नसते.
मैत्रीची किंमत पैशात
मोजता येत नसते !

मैत्री जन्माची  दात्री असते
मैत्री म्हणजे दोघांची खात्री असते.
मैत्री म्हणजे कधी हीची,
कधी त्याची.
पावसाळ्याच्या मोसमातील
असलेली एकच छत्री !

मैत्री म्हणजे
लुकलुकणारे चांदणे,
मैत्री म्हणजे हातावरचे गोंदण,
मैत्री म्हणजे
मन-मनातल्या तनाच
वेळोवेळी निंदन !

मैत्री नदीतला पारवा,
मैत्री रानामधला सरवा,
मैत्री कडक उन्हातला गारवा,
कधी पाव-मिसळीतला झण-झणीत शरवा !

राधेचा संगे असते ती मैत्री,
मीरेचा रंग असते ते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते ती मैत्री !

मुठभर सुदाम्याच्या पोह्या्त
कधीतरी गुंग असते ती मैत्री.
कधी कर्ण आणि दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते ती  मैत्री !

जेंव्हा आपलेच आपल्याला
अचानक दगा देतात.
तेव्हा मनाला आभाळा
एवढं बळ देते ती असते मैत्री...!!

No comments:

Post a Comment