Monday, June 6, 2011

पावसाचे राजकारण ------ !!!



पावसाळ्यात बघा

कसा चमत्कार घडत असतो ?

शंकराच्या पिंडीवर पाणी घालताच

पाऊस पडत असतो .



पण अगदी वेळेवर येणार

तो पाऊस कसला आहे?

त्याच्या अशा लहरी पणामुळेच

तर शेतकरी प्रत्येकवेळी फसला आहे.



त्याला जमिनीवरील राजकारणाचा

वाणावर गुणही लागू लागला आहे !

लहरी अन मनमर्जी असणारा पाऊस

बदमाशांसारखा वागू लागला आहे  !!



पाऊस पक्का विरोधी पक्ष

सरकारला नेहमी नंगा करतो.

नको तिथे पाणी सोडून

पाऊस हमखास दंगा करतो !!



आपत्ती व्यवस्थापन करूनही

हे संकट काही रोखता येत नाही .

अपुऱ्या कपड्यांनी कधी

सगळे अंग झाकता येत नाही.

No comments:

Post a Comment