Wednesday, May 11, 2011

सत्य आणि जमान्याची रीत.......... !!!!

 
सत्य जिथे उभे राहते  तिथे,
असत्येचा नक्की कल्लोळ असतो.
सत्य जर रेटले गेलेच नाही तर
सत्यावर अनैतिकतेचा हल्ला असतो !! 
नैतिक हल्ले होऊनही
सत्य चीढत नाही, कुढत नाही !
एकवेळ सत्य बदनाम होते,
पण सत्य काही केल्या
सत्यता सोडत नाही !! 
लोकांशी जर इमानदारीने वागले,
तर लोक तुम्हांला हंसू लागतात !
लोकांशी बेइमानीने वागाल ,
लोक सहज फसवू लागतात !! 
याची ना खन्त ,ना नवल,
सगळेच कसे आक्रीतल्या प्रमाणे आहे !
चुकीची असली तरीही मित्राहो
शेवटी हीच जमान्याची लोकरीत आहे !!

No comments:

Post a Comment