Saturday, April 30, 2011

तिचे पावसाळी आपत्ती व्यवस्थापन...... !!!!



तिला त्याच्या कोसळण्याचा
कधी अंदाजच येत नाही.
पण त्याच्या वादळाची शक्यता
कधी ती मनावर घेत नाही.

अंदाज नसताना सुद्धा तो ,
मुसळधार होवून कोसळतो.
तिच्या गाफीलपणा मुळेच  
तो लता होवून उसळतो.

तो मुसळधार तर  होताच
पण ती गडबडून जाते .
तिचे आपत्ती व्यवस्थापन आसे
मग बेभरवशाणे कोलमडून जाते

ती मग हतबल होत
अखेर त्याच्याशी शरण जाते !
अशा प्रकारे तीच्या आपत्तीच्या  
व्यवस्थापनाला त्याचे पावसाळी ग्रहण लागते

त्याचा सवेध घेण्यासाठी
ती बऱ्याच शाळा करत असते !
मनातल्या मनात मग नंतर
पावसाशी चाळा करत बसते !!

मग परत पाण्यात सूर्यबिंब
उगाच शोधत फिरत राहते !
का पुन्हा बरसेल तो असाच
या आठवणीत चिंब होत असते !!

पाऊस पडून गेल्यावर
मात्र ती उगाच हळहळ करते
उगाच त्याला कोसले हे काहूर
तिच्या मनामध्ये दाटते !!

No comments:

Post a Comment