Wednesday, April 20, 2011

तरी माझा भारत महान --- !!!




कार्यकर्ते कमी झाले आणि
नेतेच फार झालेत,
भारत माते ,तुझ्या नावावर
खाणाऱ्यांची खातेच फार झाले !!

वाटणीला बसले ते
वाटला तुला पुरता त्यांनी,
सर्वांच्या डोळ्या देखत,
लुटला  भारत त्यांनी !!

चोर -गिधाडांचा
एकमेंकानकडे सारखा टेका असतो.
देशाच्या अर्थकारणाला
नेमका हाच धोका असतो

आम्ही कशास सांगावे ?
कोण लुच्चे आणि कोण लफंगे आहेत ?
स्वातंत्र्याच्या या दुसर्‍या लढाई,त
काळ्यामध्ये गोरेच लपले आहे !!.

स्वातंत्र्या नंतरच्या या पहिल्या लढाईत
 आसे फार काही अंतर नाही !!
लोक सहभागा शिवाय यश,
हे काही जंतर मधले मंतर नाही !!
 

No comments:

Post a Comment